नवे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे २४ तासाच्या आतच वादग्रस्त विधान, काय म्हणाले वाचा !

Agriculture-Minister-Dattatreya-Bharane-makes-controversial-statement-within-24-hours


Dattatray Bharne :
महाराष्ट्राचे नवे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महसूल दिनानिमित्त इंदापूर येथे केलेल्या भाषणात एक अजब आणि वादग्रस्त विधान केले आहे. विधिमंडळाचे कामकाज सुरु असताना रमी खेळत असलेल्या व्हिडीओमुळे आणि आधीच्या काही वादग्रस्त विधानामुळे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांची कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आली. मात्र आता नवे कृषिमंत्री म्हणून पदभार स्वीकारलेल्या दत्तात्रय भरणे यांनी २४ तासाच्या आतच वादग्रस्त विधान केले आहे.

इंदापूर येथे महसूल दिनानिमित्त कृषीमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. त्यावेळी भरणे यांनी आपल्या भाषणात म्हटले, "सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ जे करतात, त्याची माणसं नोंद ठेवतात." या विधानाचा अर्थ अस्पष्ट असला, तरी यामुळे उपस्थित अधिकारी आणि कार्यकर्ते गोंधळात पडले. या वाक्याचा नेमका अर्थ काय यावरून आता उलट-सुलट चर्चा रंगू लागली आहे.

भरणेंनी केलेल्या या वक्तव्यामुळं वादाची चिन्हं आहेत. वाकडं काम केल्यावर ते नियमात कसं बसवता येतं? असा खोचक सवाल विरोधक त्यांना विचारत आहेत. तर सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू असून, भरणे यांच्या मंत्रिपदाच्या कारकीर्दीची सुरुवातच वादाने झाल्याची चर्चा आहे.

Agriculture-Minister-Dattatreya-Bharane-makes-controversial-statement-within-24-hours

थोडे नवीन जरा जुने