आळंदी ग्रामीण रुग्णलयास उपजिल्हा रुग्णालय दर्जावाढ देणार :- बोर्डीकर
आळंदी (अर्जुन मेदनकर) : तीर्थक्षेत्रातील आळंदी ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालय दर्जा वाढ देऊन ५० बेड्चे रुग्णालय १०० बेड्चे करण्यात येईल. यासाठी प्राधान्याने पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात विविध कारणांनी वास्तव्य असलेल्या सेलू जिंतूर विधानसभा मतदार संघातील नागरिक, मतदारांचा कौटुंबिक स्नेह मेळावा आळंदी येथील फ्रुटवाले धर्मशाळेत उत्साहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी मेळाव्यास मार्गदर्शन करताना बोर्डीकर साकोरे बोलत होत्या. मेळाव्याचे अध्यक्षस्थानी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर होते.
या प्रसंगी माजी नगराध्यक्षा तथा आळंदी भाजप मंडळ अध्यक्षा वैजयंता उमरगेकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे सदस्य डॉ. राम गावडे, तालुका अध्यक्षा भाजप शांताराम भोसले, संजय घुंडरे, ग्रामीण मंडळ अध्यक्ष अमोल वीरकर, माजी गटनेते पांडुरंग वहिले, माजी नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, दिनेश घुले, राहुल घोलप, रामचंद्र कला कुऱ्हाडे, गणेश सांडभोर, कालिदास वाडेकर, भानुदास साकोरे, माजी सभापती अरुण चौधरी, किरण येळवंडे, शिरीष कारेकर, अविनाश बोरुंदीया आदी मान्यवर उपस्थित होते.
या कौटुंबिक स्नेह मेळाव्यात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आळंदी पंचक्रोशीतील तसेच जिंतूर सेलू मतदार संघातील नागरिक यांनी उत्साही प्रतिसाद या मेळाव्यास होती. या मेळाव्यास राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी संवाद साधत नागरिकांच्या अडीअडचणी सेवा सुविधांची विकास कामे करण्यास कायम प्राधान्य राहील अशी ग्वाही देत संवाद साधला. पुण्यात राहत असलेल्या मतदार, नागरिकांसह आळंदी व पंचक्रोशीतील नागरिकांसाठी मेळाव्याचे आयोजन राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचे समर्थक कार्यकर्ते यांनी आळंदीत केले होते. तत्पूर्वी मेघना बोर्डीकर यांनी माऊली मंदिरात सदिच्छा भेट देऊन श्रींचे दर्शन घेत कौटुंबिक मेळाव्यास हजेरी लावली. यावेळी जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातील आळंदी व पंचक्रोशी परिसरात राहणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला.
कौटुंबिक मेळाव्या पूर्वी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात श्रींचे दर्शन घेत मंदिरात विश्वस्तांशी संवाद साधला. मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त निरंजन नाथ साहेब यांच्या हस्ते राज्यमंत्री बोर्डीकर यांचा श्रीफळ, शाल, ज्ञानेश्वरी प्रत देऊन त्यांचे स्वागत व सत्कार केला. या वेळी त्यांनी श्रींचे दर्शन घेत मन प्रसन्न झाल्याचे सांगितले. राज्यात अतिवृष्टी मुळे बाधित शेतकरी चिंतित आहेत. शेतकऱ्यांचे जीवन सुखी समृद्ध उज्वल व्हावे या साठी तसेच त्यांचे संकट दूर व्हावे म्हणून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणी प्रार्थना करीत साकडे त्यांनी घातले.
माऊली मंदिर श्रींचे दर्शन झाल्यानंतर जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आयोजित कौटुंबिक स्नेह मेळाव्यात मोठ्या संख्येने जिंतूर सेलू विधानसभा मतदार संघातील नागरिक उपस्थित होते. नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी बोर्डीकर कुटुंबीयांवर केलेल्या प्रेमामुळे नागरिकांनी दिलेल्या सहकार्याने विधानसभा निवडणुकीत पुन्हा निवडून येता आले असे सांगत नागरिकांच्या अडीअडचणी समस्या कायम सोडवण्यासाठी आपण प्राधान्य देत राहू अशी ग्वाही त्यांनी दिली. आळंदीत आयोजित मिळाव्यात येथील आळंदी ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढ उपजिल्हा रुग्णालयात करून ५० बेड्चे रुग्णालय १०० बेडसाठी विस्तारित दर्जावाढ करून सुविधा उपलब्ध केली जाण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील असे सांगितले. यावेळी पणे जिल्हा अध्यक्ष भाजपा प्रदीप कंद, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.